UPDATES
!! जय गजानन!!सर्वाना महाशिवरात्रीच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा ..! MPSC पूर्व परीक्षेच्या यशस्वीतेकरिता सर्व क्षेत्रातील प्रश्न-उत्तर सहित अभ्यासपूर्ण प्रश्नमालिका असलेली नाविण्यपुर्ण उत्कृष्ट वेबसाईट....! दर आठवड्याला नवीन एक ONLINE Test जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Update केली जाईल...! येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता....! तरी सर्व मित्रांनी सहकार्य करावे. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर लिंक व्दारे कळवा..!

महाराष्ट्र

भारताचा, महाराष्ट्राचा भूगोल


• महाराष्ट्र पठार – हे प्रामुख्याने बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. सह्याद्रीपासून पूर्वेस सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र                               महादेव या डोंगररांगा महाराष्ट्र पठारावर आहेत.

• तेलंगण पठार – आंध्रप्रदेशातील हे पठार अग्निज खडकापासून बनलेले आहे.

• किनारी मैदानास महाराष्ट्रात कोकण, कर्नाटकात कानडा आणि केरळमध्ये मलबार म्हणतात.

• उडीसाच्या किनारी भागास उत्कल म्हणतात.

• आंध्र व तामिळनाडूच्या किनाऱ्याला कोरोमंडल म्हणतात.

• कर्नाटकातील शरावती नदीवरील जोग धबधबा प्रसिद्ध आहे.

• पूर्व वाहिनी नदी- महानदी, गोदावरी, कावेरी, कृष्णा या नद्या बंगालच्या उपसागरास मिळतात.

• महानदी ही छत्तीसगड राज्यातील रायपूरमध्ये उगम पावते. शिवनाथ ही तिची प्रमुख उपनदी आहे.

• राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था पणजी येथे आहे.

• वुलर हे भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे.

• 1 सागरी मैल = 1.85 किमी ( नॉटीकल मैल)

• उत्तर भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांना लू म्हणतात. तर राजस्थानात आंधी म्हणतात. पश्चिम बंगाल, उडीसा राज्यात
नॉर्वेस्टर म्हणतात.

• वैशाख महिन्यात वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिम बंगालमध्ये कालबैसाखी, महाराष्ट्रात आम्रसरी, केरळ, कर्नाटकात चेरी ब्लॉसम (कॉफीस उपयुक्त)

• भारतात जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो.

• ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा मान्सून परतीचा काळ आहे.

• जगात सर्वात जास्त पाऊस हा भारतातील मौसीनराम आणि चेरापुंजी येथे पडतो.

• मृदेचे 7 प्रकार आहेत.

• गाळची मृदा ही भारतातील उत्तम कृषी मृदा आहे. ही मृदा नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी खोऱ्यात आढळते.

• काळी मृदा ही बेसॉल्ट खडकाचे अपक्षय होऊन लयार झाली आहे. या मृदेला कापसाची काळी किंवा रेगूर मृदा म्हणतात.

• तांबडी मृदा ही अतिप्राचीन रूपांतरीत स्फटीकमय खडकापासून झाली आहे. लोहसंयुगाचे प्रमाण जास्त असल्याने तांबडा रंग प्राप्त झाला आहे.

• जांभी मृदा

• पर्वतीय मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात.

• वालुकामय मृदा – राजस्थानमधील इंदिरा गांधी कालव्यामुळे मृदेची उत्पादकता वाढली आहे.

• क्षारयुक्त व अल्कली मृदा

• जगातील उत्तम प्रजातीच्या मॅंग्रुव्ह वनस्पतीचे मूळ भारतात आहे.

• बंगाली वाघांचे निवासस्थान म्हणून सुंदरबन ओळखतात.

• स्वतंत्र भारतातील पहिली जनगणना 1951 साली झाली.

• जागातील लोकसंख्येपैकी 17% लाकसंख्या भारतात आहे.

• सर्वात जास्त लोकसंख्या उत्तरप्रदेशची तर सर्वात कमी सिक्किमची आहे.

• लोकसंख्येची सर्वात जास्त घनता पश्चिम बंगालची तर कमी घनता अरूणाचल प्रदेशची आहे.

• भारतातील सुमारे 72% लोक ग्रामीण भागात राहतात.

• सतलज नदीवर हिमाचल प्रदेशमध्ये भाक्रा येथे 226 मी उंचीचे धरण हे जगातील सर्वात उंच धरणापैकी एक आहे. याच्या जलाशयास गोविंद सागर म्हणतात.

• भाक्रा प्रकल्पाच्या दक्षिणेस पंजाब राज्यात नांगल येथे दुसरे धरण बांधण्यात आले आहे.

• हिराकूड प्रकल्प उडीसा राज्यात महानदीवर आहे.

• जायकवाडी प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात पैठणजवळ गोदावरी नदीवर आहे. याच्या जलाशयास नाथसागर म्हणतात. याचा फायदा नगर, औरंगाबाद, बीड. जालना, परभणी या जिल्ह्यांना होतो. या धरणाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यान, मत्स्यपालन केंद्र, पक्षी अभयारण्य व पर्यटन केंद्र आहे.

• लाखेचा उपयोग रंग व बांगड्या बमवण्यासाठी करतात.

• खैराच्या झाडापासून कात तयार करतात.

• पंजाब व हरियाणा राज्यात सर्वात जास्त लागवडीचे क्षेत्र आहे.

• भारतातील एकूण क्षेत्राच्या 23% क्षेत्र वनाखाली आहे.

महाराष्ट्राचे हवामान—
• कोकणातील हवामान उष्ण, सम व दमट आहे.
• सह्याद्री पर्वतरांगांमध्ये माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर व आंबोली ही थंड हवेची ठिकाणे आहेत. तर, सातपुडा पर्वतरांगांमध्ये तोरणमाळ, पाल, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत.
• पठारी प्रदेश—पठारावरील हवामान उष्ण, विषम आणि कोरडेआहे.
• जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात.हे वारे अरबी समुद्रावरून वाहतात.
• आंबोली हे राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे.
• कोकण व सह्याद्री भागात सुमारे 3000 मि.मी, पर्जन्य होतो.
• विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात.
• महाराष्ट्राचे लोकजीवन— तांदूळ हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणातील लोक प्रामुख्याने मराठी व मालवणी भाषा बोलतात. कोकणातील लोक होळी व गणेशोत्सव हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे करतात.
• शेती हा पठारी भागातील प्रमुख व्यवसाय आहे. पठारावरील हवामान उष्ण, कोरडे व विषम असते. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते.
• आदिवासी वस्त्यांना विविध भागात पाडा, पौड, टोला, झाप अशी नावे आहेत.
• प्रमुख आदिवासी जमाती प्रदेश
1) गौड चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड
2) भिल्ल धुळे, नंदूरबार, जळगाव
3) कोकणा नाशिक, धुळे
4) कोरकू अमरावती जिल्ह्यातील मेळघाट
5) वारली ठाणे(जव्हार, डहाणू, मोखाडा)
6) ठाकर, महादेव कोळी पुणे, अहमदनगर,नाशिक,ठाणे
7) कोलाम राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेश

* जलसंपत्ती व सागर संपत्ती—

* विहीर महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन आहे.
* पोफळी (कोयना), जायकवाडी. भिरा, येलदरी, राधानगरी, खोपोली, भिवपुरी ही महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे आहेत.
* राज्यात वसई,भाईंदर, डहाणू आदी ठिकाणी मिठागरे आहेत.
* महाराष्ट्राला 720 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. सागरी मासेमारीत आपले राज्य अग्रेसर आहे.
* जमिनीखाली साठलेल्या पाण्यास भूजल म्हणतात.
* वनसंपत्ती—नैसर्गिक वने ही महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे.
* सदाहरीत वने—ही वने वर्षभर सदाहरीत असतात. सह्याद्रीच्या दक्षिण भागात आढळतात.
* निमसदाहरीत वनस्पती—ही वने सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराच्या भागात आढळतात. आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे.
* महाराष्ट्र राज्याचा वनक्षेत्र पानझडी वने प्रकारच्या वनाने व्यापला आहे.
* झुडपी व काटेरी वने—ही वने पर्जन्य छायेच्या प्रदेशात ही वने हमखास सापडतात.
* खारफुटी वने—पश्चिम किनारापट्टीवरील खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात.
* पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल(हिरवे कबूतर) हा आपला राज्यपक्षी आहे. तर, भिमाशंकर येथे आढळणारी शेखरू ही मोठी खार आपला राज्यप्राणी आहे.
* महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व व नैऋत्य भागात एकवटलेली आहे. महाराष्ट्रातील नैऋत्य भागात जांभा खडक आढळतो.
* खनिजे जिल्हे
1) मॅंगनीज : - नागपूर, गोंदिया, भंडारा, सिंधुदूर्ग
2) लोहखनिज: - चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदूर्ग
3) बॉक्साईट : - सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड
4) चुनखडक :- गडचिरोली, यवतमाळ(जास्त), चंद्रपूर, नागपूर
5) क्रोमाईट : - भंडारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी
6) डोलोमाईट : -यवतमाळ, रन्नागिरी(जास्त),
7) सिलिका: -  सिंधुदूर्ग
8) तांबे : -चंद्रपूर
9) अभ्रक : - नागपूर, चंद्रपूर

* मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेलक्षेत्रे आहेत.

* उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो.
* दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू ही पारंपरिक ऊर्जा साधने आहेत. तर, सूर्यकिरण, वारा, टाकाऊ पदार्थ, सागरी लाटा ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहेत. महाराष्ट्रात सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जामसांडे व विजयदूर्ग सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी ही प्रमुख केंद्रे आहेत.
* औष्णिक विद्युत केंद्रे- कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परळी, खापरखेडा, तुर्भे, पारस, चोला, डहाणू
* जलविद्युत केंद्र- पोफळी, भिरा, येलदरी, भिवपुरी, खोपोली, जायकवाडी इत्यादी.
* अणुविद्युत- तारापूर
* ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. ज्वारीचे उत्पादन खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात केले जाते.
* औरंगाबाद विभागात कडधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते.
* व्यापारी दृष्टीकोनातून जी पिके घेतली जातात, त्यास व्यापारी पिके म्हणतात.
* द्राक्षाचे उत्पादन नाशिक व सांगली येथे, जळगाव व वसईची केळी प्रसिद्ध आहेत. नागपूर जिल्हा संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हापूस व पायरी हे आंबे आहेत. घोलवडचे चिकू प्रसिद्ध आहेत. नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातारा व सांगली जिल्हा हळद व आले उत्पादनासाठी प्रसिद्ध आह* यंत्रमागाद्वारे कापड निर्मितीसाठी सोलापूर, नागपूर, भिवंडी, मालेगाव व इचलकरंजी ही महत्त्वाची केंद्रे आहेत.

महाराष्ट्रात विविध मार्गावर घाट आहेत. त्याचा तक्ता खालीलप्रमाणे दिला आहे. 

* मार्ग घाट मार्ग
  • नाशिक     थळघाट            मुंबई
  • पुणे          बोरघाट             मुंबई
  • कराड        कुंभार्ली             चिपळूण
  • कोल्हापूर   आंबा                रत्नागिरी 
  • कोल्हापूर   फोंडा                पणजी 
  • बेळगाव    आंबोली             सावंतवाडी 
  • पुणे          खंबाटकी           सातारा
  • पुणे          दिवा                 बारामती 
  • भोर          वरंधा                महाड 
  • पुणे          चंदनपुरी           नाशिक

• देशातील पहिली   विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या मार्गावर 1925 मध्ये धावली.

• कोकण रेल्वेने 2003 मध्ये स्कायबसची पहिली चाचणी घेतली.कोकण रेल्वेचा शुभारंभ 1998 साली करण्यात आला.
• आशियातील सर्वात लांबीचा बोगदा करबुडे हा होय
• लॉर्ड डलहौसीने 1853 मध्ये रेल्वे सुरू केली.

• प्रशासकीय विभाग—


1) पुणे—सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
2) नागपूर—वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
3) कोकण—मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे-रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग.
4)औरंगाबाद—बीड, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
5) अमरावती—बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ.
6) नाशिक—नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव.

• महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये—महाराष्ट्राच्या ईशान्येला छत्तीसगड, आग्नेयला आंध्रप्रदेश, दक्षिणेला कर्नाटक-गोवा, पश्चिमेला दमण दीव व दादरा नगर हवेली हे केंद्र शासित प्रदेश, वायव्येला गुजरात तर, उत्तरेला उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश आहे.

• प्रादेशिक विभाग-


1) पश्चिम महाराष्ट्र- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
2) मराठवाडा—औरंगाबाद विभाग
3) विदर्भ – अमरावती व नागपूर विभाग
4) खानदेश- धुळे, नंदूरबार, जळगाव
5) कोकण- मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग

• कृषी विद्यापीठ स्थळ स्थापना वर्ष

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 1968

  • पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 1969

  • बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली(रत्नागिरी) 1972

  • मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी 1972

  • (वरील नावे व सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी “मपबाम 68,69.72,72” असे अद्याक्षरांचे संक्षिप्त रूप करावे.)

अन्य विद्यापीठे पुढीलप्रमाणे –

  • मुंबई विद्यापीठ मुंबई 1857

  • नागपूर विद्यापीठ नागपूर 1925

  • पुणे विद्यापीठ पुणे 1848

  • एस एन डी टी मुंबई 1951

  • (महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी देशातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना 1951 ला केली. पुढे 1916मध्ये त्याचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे नामकरण झाले.)

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 1958

  • शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 1963

  • संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती 1983

  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक 1988

  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव 1989

  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 1994 

  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 1995

  • सोलापूर विद्यापीठ सोलापूर 2004

  • भारती विद्यापीठ पुणे 1964 

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणोरे(रायगड) 1889

  • कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक(नागपूर) 1996

  • पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर 2000

  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक 1988

  • श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ बालेवाडी(पुणे) 1996

महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वांत मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे.

इतिहास



महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत    इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.


मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य


महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.



त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.




मराठा व पेशवे



१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.



शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.



इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.




ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ




ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.



महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.




महाराष्ट्र राज्याची निर्मिती



ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.



अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.



बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..
या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडवलेण्यांनी नटलेला; संत नामदेव्ो, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला, मॉ जिजाऊँच्या आशीर्वादाने बहरलेला; शाहू, फुसे, आंबेडकर, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतिकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र कसा असावा? हे महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले

ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड

रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे,
घोसाडे

रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड,
जयगड

सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड,
यशवंतगड

पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड,
वज्रगड इ.

नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई-
टंकाई, चांदवड

औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद)

कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड

अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड

अकोला - नर्नाळा

सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड,
वर्धनगड

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे लेण्या 
ठिकाण/जिल्हा

अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद

एलिफंटा, घारापुरी - रायगड

कार्ला, भाजे, मळवली - पुणे

पांडवलेणी - नाशिक

बेडसा, कामशेत - पुणे

पितळखोरा - औरंगाबाद

खारोसा, धाराशीव (जैर) - उस्मानाबाद

महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :
जलाशय/नदी स्थळ/जिल्हा

जायकवाडी - बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

गंगापूर - (गोदावरी) नाशिक

राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)

उजनी - (भीमा) सोलापूर

तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

यशवंत धरण - (बोर) वर्धा

मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

खडकवासला - (मुठा) पुणे

येलदरी - (पूर्णा) परभणी

बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :

खनिज जिल्हे

दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी
(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)

बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग)

मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)

तांबे - चंद्रपूर, नागपूर
चुनखडी - यवतमाळ

डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ

क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग

कायनाईट - देहुगाव (भंडारा)

शिसे व जस्त - नागपूर

देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख 
औष्णिक जनिर्मिती केंद्रे :
औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा

पारस - अकोला

एकलहरे - नाशिक

कोराडी, खापरखेडा - नागपूर

चोला (कल्याण) - ठाणे

बल्लारपूर - चंद्रपूर

परळीवैजनाथ - बीड

फेकरी (भुसावळ) - जळगाव

तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई

भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड

कोयना (जलविद्युत) - सातारा

धोपावे - रत्नागिरी

जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी

महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग :
लघुउद्योग ठिकाण

हिमरुशाली - औरंगाबाद

पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक)

चादरी - सोलापूर

लाकडाची खेळणी - सावंतवाडी

सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर

हातमाग साडय़ा व लुगडी - उचलकरंजी

विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर,
सोलापूर

काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी

रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर),
एकोडी (भंडारा)

महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई

भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबइ

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई

इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई

कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई

नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे

वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद

भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे

सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च - नागपूर

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक

अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई

खार जमीन संशोधन केंद्र - पनवेल

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, 
स्थापना व ठिकाण :
विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान

मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई

पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर

विद्यापीठ (१९२५)

कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती

विद्यापीठ (१९८३)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद

मराठवाडा विद्यापीठ (१९५८)

शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड)

विद्यापीठ (१९८९)

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव

कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर)
विद्यापीठ (१९९८)

स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड

महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर

महाराष्ट्रातील प्रमुख 
कृषी संशोधन संस्था :

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)

गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)

नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)

सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)

काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)

हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)

राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)

महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक 
व त्यांची टोपण नावे:
कवी/साहित्यिक टोपण नावे

कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर

त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी

प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज

विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम

माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन

चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू

आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे

लातूर – हजरत सुरतशाह वलीचा दर्गा

नांदेड – शिख धर्मगुरू गोविंदसिंगाची समाधी

कल्याण – हाजीमलंग बाबाची कबर

 शिर्डी – श्रीसाईबाबांची समाधी

पंढरपूर – श्रीविठ्ठलाचे मंदिर

बांद्रा (मुंबई उपनगर) – सेंट मेरी चर्च

शेगाव – संत गजानन महाराजांची समाधी (विदर्भाचे पंढरपूर) जि. बुलढाणा

अमरावती – संत गाडगेबाबांची समाधी

 सज्जनगड (सातारा) – समर्थ रामदास स्वामींची समाधी

मांढरदेवी (सातारा) – काळेश्वरी मातेचे मंदिर

गणपतीपुळे (रत्नागिरी) – गणेश मंदिर.

श्रीक्षेत्र औदुंबर (सांगली) – दत्तात्रेयाचे जागृत स्थान कारंजा

(वाशिम) – नरसिंह सरस्वती मंदिर.

पैठण (औरंगाबाद) – संत एकनाथांची समाधी (दक्षिणेची काशी म्हणतात)

आपेगाव (औरंगाबाद) – संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान

रामटेक (नागपूर) – महाकवी कालीदास यांचे स्मारक

मोझरी (अमरावती) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी

गंगाखेड (परभणी) – संत जनाबाईंची समाधी

तुळजापूर (उस्मानाबाद) – महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे मंदिर

आंबेजोगाई (बीड) – कवी मुकुंदराज व दासोपंतांची समाधी

श्रीक्षेत्र माहुर (नांदेड) – रेणुकादेवीचे मंदिर

जांब (जालना) – श्रीसमर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी/ नरसोबाची वाडी- दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद, श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती यांचे गाव, प्रसिद्ध दत्तमंदिर

बाहुबली (कोल्हापूर) – जैन धर्मीयांचे तीर्थस्नान

सोलापूर – सिद्धेश्वर मंदीर जेजुरी – श्रीखंडोबाचे देवस्थान

जुन्नर (पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव, शिवनेरी किल्ला

आळंदी (पुणे) – संत ज्ञानेश्वरांची समाधी श्रीक्षेत्र अक्कलकोट

(सोलापूर) – श्रीस्वामी समर्थ मंदिर व मठ नेवासे

(अहमदनगर) – संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथे लिहिली.

चाफळ (सातारा) – छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट

देहू (पुणे) – संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव व कर्मभूमी

त्र्यंबकेश्वर – संत निवृत्तीनाथांची समाधी श्रीक्षेत्र नाशिक – प्रसिद्ध काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेले तपोवन, पंचवटी, रामकुंड, सीताकुंड, कपालेश्वर मंदिर, एकमुखी दत्ताचे मंदिर, मुक्तिधाम मंदिर, भक्तिधाम मंदिर, सीता गुंफा, रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कापले तेव्हापासून या स्थानाला ‘निशिक’ असे नाव पडले.

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे


त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा

औरंगाबाद भीमाशंकर- जिल्हा पुणे परळी वैजनाथ- जिल्हा

बीड औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.

महाराष्ट्रातील अष्टविनायक
गणपतीचे नाव स्थळ जिल्हा

श्री मोरेश्वर मोरगाव पुणे

श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणे

श्री महागणपती रांजणगाव पुणे

श्री विघ्नहर ओझर पुणे

श्री चिंतामणी थेऊर पुणे

श्री वरदविनायक महड रायगड

श्री सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर

महाराष्ट्रातील नदीकाठावरील 
शहरे व तीर्थक्षेत्रे नदी

पंढरपूर भीमा

नेवासे, संगमनेर प्रवरा

नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड गोदावरी

मुळा-मुठा पुणे

भुसावळ तापी

हिंगोली कयाधू

धुळे पांझरा

देहू, आळंदी इंद्रायणी

पंचगंगा कोल्हापूर

वाई, मिरज, कऱ्हाड कृष्णा

जेजुरी, सासवड कऱ्हा

चिपळूण वशिष्ठी

श्री क्षेत्र ऋणमोचन पूर्णा

महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने

कृष्णा-कोयना - कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा

कृष्णा-पंचगंगा - नरसोबाची वाडी (कोल्हापूर)

मुळा-मुठा - पुणे

वैनगंगा-वर्धा - चंद्रपूर

वर्धा-वैनगंगा - शिवनी

कृष्णा-वारणा - हरिपूर (सांगली)

तापी-पूर्णा - चांगदेव (जळगाव)

महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते
प्रमुख घाट रस्ते/महामार्ग

कसारा / थळ घाट मुंबई ते नाशिक

माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर

दिवे घाट पुणे ते बारामती

कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण

फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी

बोर / खंडाळा घाट मुंबई ते पुणे

खंबाटकी घाट पुणे ते सातारा

पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर

आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी

चंदनपुरी घाट नाशिक ते पुणे

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
थंड हवेची ठिकाणे जिल्हा

चिखलदरा अमरावती

म्हैसमाळ औरंगाबाद

पन्हाळा कोल्हापूर

रामटेक नागपूर

माथेरान रायगड

महाबळेश्वर, पाचगणी सातारा

तोरणमळ धुळे

लोणावळा, खंडाळा पुणे

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्याने ठिकाण

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणे

पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया

ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर

गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट) अमरावती

चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा,

कोल्हापूर, रत्नागिरी

महाराष्ट्रातील अभयारण्ये
अभयारण्य जिल्हा

कर्नाळा (पक्षी) रायगड

माळठोक (पक्षी) अहमदनगर

मेळघाट (वाघ) अमरावती

भीमाशंकर (शेकरू खार) पुणे

सागरेश्वर (हरिण) सांगली

चपराळा गडचिरोली

नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक

देऊळगाव रेहकुरी (काळवीट) अहमदनगर

राधानगरी (गवे) कोल्हापूर

टिपेश्वर (मोर) यवतमाळ

काटेपूर्णा अकोला

अनेर धुळे

भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (९.३६ टक्के),
तर लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.
महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची

स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.

महाराष्ट्र राज्याची स्थापना – १ मे १९६०.

महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.

महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १’

उत्तर. रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व.

महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.

महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)

महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर

प्रशासकीय विभाग- सात (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर).

महाराष्ट्रात एकूण जिल्हे- ३५, जिल्हा परिषदा- ३३, पंचायत समिती- ३५३, ग्रामपंचायत- २८,०२९, महानगरपालिका- २३, नगरपालिका- २२४. नगरपंचायती- दापोली, शिर्डी, कणकवली (३), कटकमंडळे- ७

महाराष्ट्रात एकूण महसूली खेडी- ४३,७२५.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

महाराष्ट्र राज्याचा वृक्ष- आंबा, राज्य प्राणी- शेकरू, राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन, राज्य पक्षी- हरावत, राज्य भाषा- मराठी.

महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य- वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात – ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.

२००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या- ९ कोटी, ६८ लाख, ७९ हजार.

लोकसंख्येची घनता- ३१४ व्यक्ती दर चौ. कि.मी.

स्त्री-पुरुष प्रमाण- ९२२ (दरहजारी).

पुरुष साक्षरता- ८३.३ टक्के, स्त्री साक्षरता- ६७.५ टक्के (२००५- ७१.६० टक्के).

महाराष्ट्रातील :

१) क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा- अहमदनगर, लहान जिल्हा- मुंबई शहर

२) सर्वात जास्त पावसाचे ठिकाण – अंबोली (सिंधुदुर्ग), सर्वात कमी- सोलापूर

३) सर्वात जास्त साक्षर जिल्हा- मुंबई उपनगर सर्वात कमी- नंदूरबार.

४) सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा- मुंबई उपनगर, सर्वात कमी- गडचिरोली.

५) सर्वात जास्ते स्त्रिया असणारा जिल्हा- रत्नागिरी, सर्वात कमी- मुंबई शहर.

६) सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे प्रमाण- ठाणे, सर्वात कमी- सिंधुदुर्ग.

७) सर्वाधिक लोकसंख्येची घनता – बृहन्मुंबई, सर्वात कमी- गडचिरोली.

८) सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा- अहमदनगर.

९) सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा- अहमदनगर.

महाराष्ट्रातील सर्वात पहिले :

१) पहिले साप्ताहिक- दर्पण (१८३२)

२) पहिले मासिक- दिग्दर्शन (१८४०)

३) पहिले दैनिक वर्तमानपत्र- ज्ञानप्रकाश

४) पहिली मुलींची शाळा- पुणे (१८४८)

 ५) पहिली सैनिकी शाळा- सातारा

६) पहिला साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग

 ७) पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा

 ८) पहिला पर्यटन जिल्हा- सिंधुदुर्ग

९) पहिले पाण्याचे खासगीकरण करणारे शहर- चंद्रपूर

१०) पहिले ऊर्जा उद्यान- पुणे

११) उपग्रहाद्वारे शहराचे सर्वेक्षण करणारी पहिली नगरपालिका- इचलकरंजी (कोल्हापूर)

महाराष्ट्राची 
प्राकृतिक रचना व हवामान :-

महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्टय़ा तीन प्रमुख विभाग- कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट व महाराष्ट्र पठार इ.

सह्य़ाद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन किनारपट्टी तयार झाली.
कोकण किनारपट्टीची उत्तर-दक्षिण लांबी ७२० कि.मी. तर रुंदी ४० ते ८० कि.मी. आहे.

उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा प्रदेश कोकणपट्टीत मोडतो.

कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडील पूर्वेकडून वाढत जाते.

महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी ४४० कि.मी. आहे.
सह्य़ाद्री पर्वतास ‘पश्चिम घाट’ असेसुद्धा म्हणतात.

उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्य़ाद्री पसरलेला आहे.

सह्य़ाद्री पर्वताची सरासरी उंची १२०० ते १३०० मीटर आहे.
महाराष्ट्राचा ९० टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.

महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे.
महाराष्ट्रातील पठारी भागाचे हवामान विषम व कोरडे आहे.
कोकणपट्टीचे हवामान दमट व सम प्रकारचे आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो.

सह्य़ाद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

सह्य़ाद्री पर्वताच्या पूर्वेकडील पठारास महाराष्ट्र
पठार किंवा दख्खन पठार असे म्हणतात.

शंभू महादेव डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली.

हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली.

सातमाला अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली.

महाराष्ट्रातील परीक्षाभिमुख इतर वैशिष्टय़े व जिल्हानिहाय टोपण नावे :-

भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

भारताची आर्थिक राजधानी – मुंबई.

महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर

महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड

महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड

मुंबईची परसबाग – नाशिक

महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी

मुंबईचा गवळीवाडा- नाशिक

द्राक्षांचा जिल्हा- नाशिक

आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार

महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव

महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ

संत्र्याचा जिल्हा- नागपूर

महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती

जंगलांचा जिल्हा- गडचिरोली

महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव

साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर

महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर

महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर

कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर

लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद

महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर- औरंगाबाद

महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा- बीड

महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा- उस्मानाबाद

महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा- नांदेड

देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा- अमरावती.

बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..

या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडवलेण्यांनी नटलेला; संत नामदेव्ो, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला, मॉ जिजाऊँच्या आशीर्वादाने बहरलेला; शाहू, फुसे, आंबेडकर, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतिकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र कसा असावा? हे महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे.